SÛleÛjpÙele

Thursday, September 9, 2010

मनमोहनसिंगांचं इतिहासाचं पुनर्लेखन

आपल्याला हवं तसं इतिहासाचं पुनर्लेखन हिंदुत्ववादी करतात, म्हणून त्यांच्यावर टीका केली जात असते. ती योग्यच असते. पण त्यांच्यावर टीका करणारेही फारसं काही वेगळं करीत नसतात.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संपादकांच्या बैठकीत केलेली काही विधानं हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे.
मंत्रिमंडळातील मंत्री परस्परांर आरोप_प्रत्यारोप करतात, त्यासंबधी या बैठकीत प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा मनमोहन सिंह यांनी अशी भूमिका घेतली की, 'नेहरू व इंदिरा गांधी यांच्यापेक्षा त्यांचं मंत्रिमंडळ अधिक एकजिनसी आहे. नेहरू व सरदार पटेल यांच्यात मतभेद होते, ते एकमेकांना पत्रं पाठवत असत; त्याचप्रमाणं इंदिरा गांधी यांना मोरारजी देसाई यांचा विरोध होता, चंद्रशेखर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तर वेगळा गटा स्थापन केला होता.'
मनमोहन सिंह यांची ही विधानं बघितल्यास, एक तर स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या इतिहासाबाबत ते पूर्ण अज्ञानी तरी असावेत किंवा सज्जन, ज्ञानी, समतोल विचार करणारे ही त्यांची प्रतिमा खोटी असून ते पराकोटीचे मतलबी आहेत, असं म्हणं भाग आहे.
नेहरू व पटेल यांच्यात मतभेद होते. पण ते एकमेकांच्या विरोधात जाहीरपणं बोलत नसत. किंबहुना नेहरू व पटेल यांच्यात मतभेद असूनही त्यांना एकमेकांविषयी पराकोटीचा आदर होता. दोघानी एकत्र येऊन सरकार चालवणं गरजेचं आहे. याची त्यांना जाणीव होती. एकमेकाची बलस्थानं व कमतरता यांची दोघांनाही कल्पना होती. राजमोहन गांधी यांनी पटेल यांचं जे चरित्र लिहिलं आहे, त्यातील एक प्रसंग हे दोघं नेते किती मोठे होते, यावर प्रकाश टाकणरा आहे. एकदा मुंबईत पटेलांना भेटावयास काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आले होते. त्यावेळी पुरषोत्तमदास टंडन यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून नेहरू व पटेल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी या काँगं्रेस नेत्यांपैकी काहींनी पटेलांना सुचवलं की, पक्ष तुमच्या ताब्यात आहे, तेव्हा तुम्हीच पंतप्रधान का होत नाही? त्यावर पटेलांनी उत्तर दिलं होतं की, 'पक्ष माझया पाठीशी असला, तरी लोक जवाहरलालच्या मागं आहेत, हे तुम्ही विसरत आहात'. पटेलांना जशी आपल्या मर्यादांची जाणीव होती, तशी नेहरूंच्या बलस्थानांचीही चांगली कल्पना होती, हे दर्शवणारा हा प्रसंग आहे.
मनमोहन सिंह यानी इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. पण मंत्रिमंडळातील निर्णयांबाबत मोरारजी इंदिराजींच्या विरोधात बाहेर बोलत नसत आणि चंद्रशेखर हे तर मंत्रिमंडळात नव्हतेच. ते पक्षाच्या कार्रकारिणीचे सदस्य होते. तेथे त्यांनी तरूण तुर्कांचा गट बनवला होता. असे गट काँग्रेस पक्षात पूर्वापार अगदी स्वातंत्र्य चळवळीच्या अगोदरपासून होते. तेव्हा काँग्रेसला 'हायकमांड' नव्हतं. कार्यकारिणी व संसदीय मंडळ हेच सर्वोच्च असतं. तेथेच निर्णय होत असत. इंदिराजींनी ही व्यवस्था बदलत नेली व पक्षात 'हायकमांड' निर्माण केलं. हे 'हायकमांड' म्हणजे इंदिराजी व त्यांच्या भोवतीचं कोंडाळं होतं. नंतर तीच प्रथा राजीव यांनी चालवली आणि तीच प्रथा आज सोनिया चालवत आह
अशा परिस्थितीत आज काँग्रेसमध्ये व देशाच्या मंत्रिमंडळात जे बाजारबुणगे नेते आहेत, त्यांची तुलना नेहरू व पटेलांशी मनमोहर सिंह करतात, हा खरोखरच कमालीचा करंटेपणा आहे. तसा तो मनमोहन सिंह करतात, तेव्हाच त्यांच्या एकूणच प्रामाणिकपणाविषयी शंका निर्माण होते.

No comments:

Post a Comment