SÛleÛjpÙele

Tuesday, August 31, 2010

क्रिकेट: सट्टेबाजांचा खेळ

पाक क्रिकेट संघातील अनेक खेळाडू 'मॅच फिक्सिंग'मध्ये अडकल्यानं चर्चेला उत आला आहे. 'जटलमन्स गेम' मानल्या जाणाऱ्या क्रिकेटवर ही नामुष्कीची वेळ आली आहे, असं मत माडलं जात आहे. 'आयसीसी'नं आता काही कठोर पावलं टाकायला हवीत, असं सुचवलं जात आहे.
हा जो सगळा चर्चेचा सूर आहे, तो बघितला की, आपल्या देशातील माध्यमं, त्यात चर्चा करणारे तज्ज्ञ आणि इतर क्रिकेटप्रेमी यांच्या भाबडेपणाबद्दल हसावं की, अशा काही कारवाईनं क्रिेकट पुन्हा एकदा 'जंटलमन्स गेम' बनेल या आशावादाबद्दल त्यांची कीव करावी, असा प्रश्न पडतो.
आज पाक क्रिकेट संघावरून गदारोळ उडाला असताना बॉब वुल्मर याची कोणाला कशी आठवण होत नाही? गेल्या विश्वचषक सामन्यांच्या वेळी वेस्ट इंडिजमध्ये वुल्मरचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचं कारण आजही उलगडलेलं नाही. वुल्मर हा पाक संघाचा प्रशिक्षक होता. वुल्मरच्या मूत्यूनंतर सुरूवातीस वेस्ट इंडिजमधील सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. तेथील स्थानिक मॅजिस्ट्रेटनं शवचिकत्सा अहवालाच्या आधारे संशयास्पद मृत्यू अशी नोंदही केली हाती. हॉटेलातील 'सीसी टीव्ही' कॅमेऱ्याच्या आधारे केलेल्या तपासणीत मृत्यूच्या आधी वुल्मरची भेट क्रिकेट क्षेत्राबाहेरच्या व्यक्तींशी भेट झाल्याचं दिसत होतं. मात्र नंतर वुल्मरचं ह्रदयविकारानं मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि मॅजिस्टे्रटचा निष्कर्ष बाद ठरवण्यात आला.
वुल्मरचा मृत्यू 'मॅच फिक्सिंग'च्या प्रकरणामुळंच झाला, अशी उघड चर्चा त्यावेळी सुरू होती. पण विश्वचषकाला गालबोट लागू नये, म्हणून 'आयसीसी'नंच हे सगळं प्रकरणं दडपून टाकलं, असंही मानलं गेलं.
आज आता पाक संघाचे हे सगळे कारनामे उघड झाल्यावर गेल्या 80 सामन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्यचं सांगितलं जात आहे. मग बॉब वुल्मरच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करायला काय हरकत आहे. पण तसं होणार नाही; कारण 'आयसीसी'पासून कोणालाच खऱ्या अर्थानं हे प्रकार थांबवण्यात रस नाही. क्रिकेट हा 'जंटलमन्स गेम' आहे, म्हणून नुसत्या गप्पा मारत राहयचं, पण हा आता पैशचा खेळ आहे. भारतीय उपखंडातील देशातच या खेळाचं वेड आहे आणि त्याचा फायदा घेऊन पैशाची खाण खोदली जात आहे. केवळ पाक खेळाडूंना झोडपून काय उपयोग? हेच पाक खेळाडू 'आयपीएल' सामन्यांत खेळले नाहीत, म्हणून पाकिस्तानच्या प्रेमाचं भरतं आलेल्या अनेकांनी किती ओरडा केला होता? आज त्यांची तोंड बंद आहेत. वसीम अक्रम हा अशा प्रकारात 1998 सालीच गुंतलेला आढळून आला होता. पण आजही तो एका आयपीएल संघाचा प्रशिक्षक आहे आणि कॉमेन्टरीही करीत असतो.
किंबहुना 'आयपीएल' हा एक मोठा सट्टा आहे आणि त्यात भारतीय क्रिेकट नियामक मंडळ, आयसीसी आणि भारतीय व इतर देशातील खेळाडू सामील आहेंत. जनतेच्या क्रिेकटच्या वेडाचा फायदा घेऊन हे सारं जण अब्जावधींच माया कमावत आहेत.
म्हणूनच क्रिकेट हा आता 'जंटलमन्स गेम' राहिलेलाच नाही. घोडयाच्या शर्यतीसारखा तो पैसे मिळवण्याचा सट्टा बनला आहे.
पाक संघाच्या 'मॅच फिक्सिंग'मधील सहभागानं हेच पुन्हा एकदा सिध्द केलं आहे.

पवारांचा पलटवार

काही बोलण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी योग्य मोका साधणं, हे राजकारणातील एक महत्वाचं कौशल्य असतं. शरद पवार यांच्याकडं हे कसब आहे, याचा पुरेपूर प्रत्यय त्यांनी अनेकदा आणून दिला आहे. पण अलीकडच्या काळात पवार आपला हा 'शुअर टच' गमावून बसले आहेत की काय, असं वाटू लागलं होतं. पण पक्षाच्या कार्यकत्यांच्या बैठकीत इतर अनेक विषयावर बोलताना त्याच ओघात पवारांनी महाराष्ट्रताील विरोधी पक्षनेत्यावर शरसंधान केलं. हे नेते बिल्डरांवर विधानसभेत आरोप करतात आणि नंतर त्यांच्याशी तोडपाणी करतात, असं पवार म्हणाले.
...आणि हे विधान करण्यामागं पवार यांचा जो मुख्य उद्देश होता, तो लगेचच साध्य झाला.
या मुद्यावर आता गदारोळ उडणार, हे त्यांना अपेक्षित होतं. त्यावर प्रसार माध्यमांत चर्चा होत राहणार, हेही ते जाणून होते. या आरोपाचं खंडन करण्यात विरोधी पक्ष गुंतून पडणार, हेही पवार जाणून होते.
झालंही तसंच आणि पवारांना नेमकं तेच हवं होतं.
...कारण गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा लवासा प्रकल्पाचा मुद्दा गाजू लागला होता आणि तो तसा गाजवण्यामागं काँग्रेसचा हात होता. नारायण राणे यांच्याकडील महसूल खात्यात असलेला एक अहवाल पुन्हा बसनातून काढण्यात आला होता. हा विषय काँग्रेसमधील एक गट आपल्याला लक्ष्य करण्यासाठी उठवत आहे, त्यांची विरोधी पक्षांशी हातमिळवणी आहे, हे पवार जाणून आहेत. शिवाय गेल्या दोन विधानसभा अधिवेशनात भूखंडांची ज्या प्रकरणवरून आराेंप झाले, त्यातील काही बषाल्डर हे पवारांच्या गोतावळयातील आहेत. या आरोपांमागचा खरा उद्देश हा आपल्याला लक्ष्य करण्यााा आहे, याकडं पवार कसे डोळेझाक करतील? आपल्याच पक्षातील काही मंत्री व नेतेही या रणनीती अप्रत्यक्षपणं सामील आहेत, हेही पवारांना माहीत आहे. पण काँग्रेसवर सरळ हल्ला चढवणं त्यांना नको होतं. तेव्हा पवारांनी विरोधी पक्षांवरच रोख ठेवला आणि सगळया चर्चेचा पटच बदलून टाकला. पवारांनी हा 'सिग्नल' दिल्यावर त्यांचे चेले सर्व वृत्तवाहिन्यांवरील चर्चात तीच 'री' ओढत राहिले आणि त्यांना उत्तर देण्यात भाजपा व सेना नेते गुंतून पडले. 'लवासा'चा प्रश्न मागे पडला.
या सदंर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा' हे जे दुष्टचक्र आपल्या देशात तयार झालं आहे, त्यातील शरद पवार हे एक आघाडीचे भिडू आहेत. बाकी सगळं ते चालवून घेऊ शकतात. पण सत्ता आणि पैसा यातील हितसंबंधाना धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास पवार अत्यंत निर्घृणपणं तो मोडून काढतात. 'लवासा' हा पैशाचा प्रश्न आहे. हे पवार कसं खपवून घेतील? ते पलटवार करणारच होते. फक्त त्यांच्या सोईनं, त्यांच्या पध्दतीनं त्यांनी तो केला एवढंच.
आता पवार यांचे विरोधक त्यांच्यावर प्रतिवार करण्यात गुंतून पडले आहेत आणि पवार मजा बघत बसणार आहेत.
...कारण पवार यांनी जो आरोप केला, त्यात तथ्य आहेच. केवळ काँग्रेस व राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा व सेना यांचंही बिल्डर लॉबीशी साटंलोटं चांगलंच घट्ट आहे. किंबहुना राज्यकारभारावर बिल्डर लॉबीची पकड आहेच.
त्यामुळं विरोधकांना विश्वासार्हता नाही, हे पवार यांना ठाऊक आहे. त्याचाच ते फायदा उठवत आहेत.

दहशतवादाला रंग असतोच

एखादी समस्या निर्माण झाली की, रोखठोक व पारदर्शी पध्दतीने प्रामाणिकरीत्या चर्चा व संवाद घडवून आणायाचा आणि सर्वमान्य तोडगा काढायचा, ही खरी असते लोकशाही राज्यव्यवस्थेतील रीत. मात्र गेली 60 वर्षे लोकशाही राज्यव्यवस्था राबवण्याचा अभिमान मिरवताना आपण ही रीत पार विसरून गेलो आहोत. वितंडवाद आणि विसंवाद ही आपल्या लोकशाहीतील आता प्रमुख वैशिष्टय बनली आहे. प्रश्न कोणताही असो, आपण मुद्याला भिडतच नाही. हा प्रश्न सोडविण्याऐवजी नुसती अटीतटी निर्माण करून आणि त्याद्वारे जनभावना भडकावून आपलं कुरघोडीचं राजकारण कसे साधता येईल, इताकच कोता विचार केला जाऊ लागला आहे. परिणामी देशाला भेडसावरणाऱ्या अनेक बिकट समस्या या सत्तेच्या साठमारीतच्या राजकारणात अडकून अधिकच बिकट बनत गेल्या आहेत.
याचं ताजं उदाहरण आहे, ते 'भगवा दहशतवा' या केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानाचं.
गृत्रहमंत्र्यांच्या या विधानामुळं संसदेत गदारोळ माजला. भाजपा व शिवसेननं चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाद वाढला, तसं 'दहशतवादाला कोणताही रंग नसतो, दहशतवाद हा दहशतवाद असतो', अशी भूमिका घेऊन काँग्रेसनं गृहमंत्र्यांनाच एकटं पाडलं. मग वृत्तवाहिन्यांवर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं आणि 'दहशतवादाला रंग नसतो', हेच पालूपद प्रत्येक जण म्हणू लागला.
खरं तर दहशतवादला रंग नसतो, हा मुद्याच बोगरस आहे. भारतात जे दहशतवाद 1978 नंतर पसरत गेला आहे, तो धर्माधिष्ठितच होता, हे नाकारण्यात काय हशील आहे? खलिस्तानी दहशतवाद हा शीख पंथाच्या एकांतिक व अतिरेकी विश्लेषणावर आधारित होता. भिन्द्रनवाले व त्याचे साथीदार याना शिखांसाठी स्वतंत्र 'खलिस्तान' स्थापन करायचं होतं. त्यामागची प्रेरणा ही धार्मिकच होती. सर्व शीख पंथीयांना ती मान्य नसली, तरी भिन्द्रनवाले याचं शीख पंथाचं विश्लेषण अयाोग्य आहे, असं भले भले शीख बुध्दिवादी म्हणायला तयार नव्हते. अपवाद फक्त खुशवंत सिंह यांचा. त्यांनी पहिल्यापासूनच भिन्द्रनवाले हा अडाणी व मूर्ख माणूस आहे, अशी सडेतोड भूमिका घेतली होती. पण सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईनंतर खुशवंत सिंह यांनी त्यावर कडक टीकाही केली. 'भिन्द्रनवाले चुकत असेल, पण त्यानं उपस्थित केलेल्या मुद्यांचं काय', असा सवाल बहुतेक शीख बुध्दिवंत विचारत राहिले होते.
या दहशतवादाचा रंग भगवाच होता.
त्यानंतर काश्मीरमध्ये व पुढं देशाच्या इतर भागांत पाक पुरस्कृत दहशतवाद पसरत गेला. अफगाणिस्तानातून सोविएत फौज परत गेल्यावर या दहशतवादाला 'जिहादी' ष्वरूप येत गेलं आणि पुढं 9।11 च्या न्यूयॉर्क येथील हल्ल्यानंतर तर हा दहशतवाद पूर्णपणं जिहादीच बनला. ओसामा_बिन--लादेन किंवा मुल्ला ओमर अथवा ल्ष्कर_ए_तय्यबाचा सईद यांनाजगभरात इस्लामी राज्य आणायचं आहे. त्यांना जगभर शरियतचा काया लागू करायचा आहे. त्यासाठी मुस्लिम नसलेल्या काफिरांच्या विरोधात त्यांनी जिहाद पुकारला आहे. इस्लामचं हे चुकीचं विश्लेषण आहे. पण तसं उघडपणं अलीकडं काही बुध्दिवंत म्हणू लागले आहेत. पण इतकी वर्षे कोणीही इस्लामी धर्मवेत्ते ओसामा-बिन_लादेनला खोटं ठरवायला तयार नव्हते. तो म्हणत असलेली जिहादीची संकल्पना इस्लामच्या धर्मशास्त्रात बसत नाही, असं खणखणीतपणं कोणी म्हणत नव्हतं. आताशाच काही जण तसं सांगू लागले आहेत. भूमिका घेतली जात होती, ती' 'तो उठवत असलेल्या मुद्यांचं काय' हीच.
या दहशतवादाचा रंग हिरवाच होता व आहे.
उरलला प्रश्न 'भगव्या दहशतवादा'चा.
चिदंबरम असं म्हणाल्यामुळं त्यांनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला आहे, असा आरोप होत आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्याला हवा, अशी मागणी केली जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे नांदेड. परभणी, गोवा, ठाणे, हैदराबाद, अजमेर इत्यादी ठिकाणी ज्या दहशतवादी घटना घडल्या आणि त्या बद्दल ज्या लोकांना पकडण्यात आले आहे, ते हिंदू असले, तरी त्यांची प्रेरण ही हिंदुत्ववादी विचारसरणी हीच आहे. हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. हिंदुत्व ही राजकीय विचारसरणी आहे. हिंदू र्ध्मा सर्वसमावेशक आहे, तसं हिंदुत्व नाही. हिंदू धर्म ही जीवनप्रणाली आहे, पण हिंदुत्व ही नव्हे. आपल्याकडे पध्दतशीरपणं बुध्दिभैद केला जात आला आहे की, सर्वोच्च न्यायालयानं हिंदुत्व ही जीवनप्रणाली असल्याचं मान्य केलं आहे. वस्तुत: सर्वोच्च न्यायालयानं हिंदू धर्माबाबत हे विधान केलेलं आहे. पण हिंदू धर्म म्हणजेच हिंदुत्व असं ठसवण्यासाठी हा खोटारडेपणा केला जात आला आहे. हिंदुत्वाची ही जी विचारसरणी आहे, तिचा पाया हा एकजिनसी समाज व्यवस्थेचा आहे. म्हणूनच सावरकरांनी 'पुण्यभू व पित्रभू' अशी मांडणी केली. इतिहासाच्या एका विशिष्ट पध्दतीच्या विश्लेषणावर हिंदुत्वाचा सगळी पायाभरणी झाली आहे. भारतातवर परकीय आक्रमणं झाली, ती हा समाजा विखुरलेला असल्यलानं आणि त्यामुळं स्वत्व गमावून बसल्यानं. त्याासाठी समाज एकजिनसी हवा आणि त्यानं सर्वार्थानं बलिष्ठ व्हायला हवं, असा तोडगा सुचलला गेला. सावरकराचा जातिव्यवस्थेला व अंध्ग्ध्दांना विरोध होता, तो त्यासाठीच. आधुनिकतेवरचा त्यांचा भरही त्याच उद्दिष्टापोटी होता. म्हणूनच जातीपातीच्या विरोधात असलेल्या सावरकरांना आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हते. समाजा एकजिनसी असण्याच्या ते विरोधात जातं यासाठीच. या देशात हिंदू हे बहुसख्य असल्यानं भारत हा हिंदूंचाच आहे, इतरांना येथे राहता येईल, पण ते विशिष्ट मर्यादेतच, अशी त्यांची भूमिका होती. या पयावर त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्यााची किंवा कोणतेही व कितीही कष्ट उपसायची अथवा त्याग करायची त्यांची तयारी होती. गांधीजीची हत्या झाली, तिचं कारण नेमकं हिंदू धर्म व हिंदुत्वातील फरक हेच होतं. महात्माजी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणून घेत असत. वस्तुत: हिंदू धर्म व हिंदुत्व एकच असतं, तर हिंदू धम पाळणाऱ्या महात्माजींचा खून करण्याचं सावरकरांचा अनुयायी असलेल्या नथुरामला काही कारणच नव्हतं. तरीही नथुरामनं गांधीजींचा खून केला, तो खरा हिंदू धर्म काय आहे, ते आपल्या उक्ती व कृतीतून दाखवून देणारे महात्माजी हिंदुत्ववाद्यांना अडचणीचे ठरत होते. हे जे हिंदुत्व होतं, ते संघानं नंतर रणनीतीचा भाग म्हणून त्यातल अतिरेकाचा भाग थोडा वगळून स्वीकारलं. मात्र गाभा तोच राहिला आहे. गुजरातसारख्या घटनांनी त्याची प्रचिती आणून दिली जात आली आहे.
मात्र हा अतिरेकी प्रवाह हिंदुत्वाच्या मुख्य प्रवाहाच्या परिघावरच तसाच राहिला. आज अभिनव भारत किंवा सनातन प्रभात अथवा रामसेनेच्या रूपानं तो दृश्य स्वरूपात प्रकट होत असतो.
या दहशतवादाचा रंग भगवाच आहे.
जर 'सर्व दहशतवादी इस्लामी असतात, पण सर्व इस्लामी दहशतवादी नसतात', असं आपण सरसहा म्हणत असू, तर 'अशा घटनांत हात असलेले सर्व दहशतवादी हिंदू असतात, पण सर्व हिंदू दहशतवादी नसतात', असं कोणी म्हटलं तर हरकत घ्यायचं काय कारण आहे? जिहादी दहशतवादाची कारण इस्लामध्येच आहेत, असं जर आपण मानत असलो, तर अशा हिंदुत्ववादी दहशतवादाची कारणं त्या विचासरणगीतच आहेत, असं मानल्यास आक्षेप कसा काय घेता येईल? मुस्मिल बुध्दिवंतापैकी अनेक जिहादी दहशतवादाबाबत बोटचेपी भूमिका घेत आले आहेत, म्हणून जर दोष द्यायचा असेल, तर हिंदुत्ववादी दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांना तोच न्याय का लावायचा नाही?
एक गोष्ट स्पष्टपणं लक्षात ठेवायला हवी की, जिहादी असो वा हिंदुत्ववादी वा खलिस्तानी, दहशतवादाला धर्माचाच आधार होता व आहे. फक्त असा आधार घेणारे धर्माचं आपापल्या परीनं विकृत विश्लेषण करीत आले आहेत. जसं भिन्दनवाले व त्याचे साथीदार शीख पंथाचे आपल्याला सोईचं ठरणारं विश्लेषण करीत असत. तीच गोष्ट जिहादींची आहे आणि तेच हिंदुत्ववाद्यांबाबत म्हणता येईल. शीख, इस्लाम वा हिंदू हे धर्म पाळणाऱ्या बहुसंख्यांना हे विश्लेष्ण मान्य नव्हतं व नाही. त्या दृष्टनिं हे दहशतवादी अल्पमतातच असतात. तरीही त्यांचा प्रभाव राहतो व अधून मधून वाढतो, तो खऱ्या खोटया गोष्टींची बेमालूम मिसळण करून ते सर्वसामान्यांचा बुध्दिभेद करीत असतात म्हणून.
दहशतवादाच्या विरोधात लढण्याच्या गप्पा मारणारा काँग्रेस पक्ष सत्तेच्या राजकारणाच्या सोईसाठी प्रश्नाला भिडण्याऐवजी बोटचेपी भूमिका घेऊन आपल्याच गृहमंत्र्यांना एकटं पाडत आहे. जिहादी दहशतवादाबाबत काँग्रेस असंच वागत असल्यानं मग चिदंबरम यांनी 'भगव्या दहशतवादाचा' मुद्दा काढल्यावर सेनेला अफझल गुरूचा प्रश्न पुढं सरकवता येतो. मग मूळ दहशतवादला तोंड देण्याचा देशहिताचा मुद्दा मागं पडून सत्तेचं कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू होतं.
तेच आज 'भगव्या दहशतवादा'च्या वादत होत आहे.