SÛleÛjpÙele

Tuesday, June 8, 2010

भारतीय मुस्लिमांपुढील पेच

मालेगाव पुन्हा एकदा प्रकाशझोत आलं आहे, ते मुस्लिमविषयक प्रश्नामुळंच. ताजं निमित्त घडलं आहे, ते त्या गावातील पाच मुस्लिम कुटुंबांना उलेमांनी धर्मबहिष्कृत केल्याचं. शरीफभाई कुकरवाले हे मुस्लिम गृहस्थ गेली कित्येक वर्षे कुराणातील विविध तत्वांचं निरूपण गावातील हिंदू वस्त्यात जाऊन करीत आले आहेत, तसंच हिंदूधर्मतील गीतेचं सारं मुस्लिम वस्त्यांतील लोकांना सांगत आले आहेत. सामाजिक सलोख्याच्या दिशेनं शरीफभाईचे हे प्रयत्न चालू होते. त्यांना मुस्लिम समाजातील इतरही काही व्यक्ती व कुटुंबं शरीफभाई यांची पाठराखण करीात होती. त्यापैकी चार कुटुंबांनाही धर्मबहिष्कृत करण्यात आलं आहे.
इतकी मोंठी घटना घडली, पण राष्ट्रीत स्तरावरच्या प्रसार माध्यमांत त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्रतील मराठी प्रसार माध्यमांनी या घटनेवर प्रकाशझोत टाकला. मात्र राज्यातील व देशातील राजकीय क्षेत्रांत पूर्ण सन्नाटा आहे. खरं तर कोणी कोणाला वाळीत टाकणं, ही गोष्ट हा आपल्या कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला नाही. कोणी तक्रार केलेली नाही, असा दावा पोलिस करू शकत नाहीत; कारण गुन्हा घडत असल्यास त्यावर कारवाई करणं, हे पोलिसांचे कर्तव्य असतं. हेच कर्तव्यं पार पाडण्यात पोलिसांनी हयगय केली आहे.
तशी ते करू शकलें, याचं कारण मुस्लिम समाज आहे तसाच पुराणमतवाद्यांच्या कचाटयात राहावा आणि या पुराणमतवाद्यांना हाताशी धरून आपल्याला या समाजची एकगठ्ठा मतं मिळवता यावीत, असाच बहुतेक राजकीय पक्षाचा दृष्टिकोन राहिला आहे. दुसरीकडं हिंदुत्ववादी गट, संघटना व पक्ष मुस्लिम समाजालाच लक्ष्य करीत आले आहेत. या दोन्ही गोष्टी उलेमांच्या फायद्याच्या ठरत आल्या आहेत. आपण घश्रले गेलो आहोत, आपलं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं, तेव्हा आपण आपली ओळख टिकवण्यासाठी धर्माचं काटेकोर पालन केलं पाहिजे, तरच आपला टिकावा लागेल, असं समाजाला पटवून देण्यासाठी हिंदुत्ववाद्यांचा प्रचाराचा फायदा उलेमांना उठवता येतो. त्याचबरोबर हिंदुत्ववाद्यांच्या हल्ल्यापासून फक्त 'सेक्युलर' पक्षच आपलं रक्षण करू शकतात, असं समाजमन तयार करणंही उलेमांना शक्य होतं. एक प्रकारे 'आपण वेढले गेलो आहोत', ही भावना मुस्लिम समाजमनात प्रबळ होत जाते.
गेली 60 वर्षे हेच चालू आहे.
यात बदल घडवून आणता येऊ शकतो काय?
निश्चितच येऊ शकतो.
मात्र त्यासाठी गरज आहे, ती मुस्लिम समाजातील शहाण्या सुरत्या लोकांनी एकत्र येऊन मूलभूत विचार करण्याची आणि तसा विचार करण्यासाठी बहुसंख्याक समाजातील श्हाण्या सुरत्या लोकांना त्यांना पाठबळ देण्याची.
भारतीय मुस्लिमांपुढील खरा पेच आहे, तो पश्चिम आशियातील मुस्लिम समाजाची भारतीय शाखा म्हणून राहायचं की, भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगायचं, हाच.
भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगण्याचा निर्णय येथील मुस्लिम समाजानं घेतला, तर त्यासाठी त्याला मूलभूत विचार करण्याची गरज भासणार आहे.
...आणि त्याची सुरूवात कुराणापासूनच होते.

कुराणाचे दोन सरळ भाग पडतात. एक मक्केतील व दुसरा मदिनेतील. मक्केतील बहुतांश आयती प्रेंषिताच्या 'रसूल' या भूमिकेतून आल्या आहेत. धर्माची उदात्त तत्त्वं या आयतीत सांगितली आहेत. उलट मदिनेतील आयती या प्रेषिताच्या 'राष्ट्रपती' या भूमिकेतून आल्या आहेत. प्रेषिताच्या आयुष्यातल मदिनेचा काळ हा संघर्षाचा होता. त्याला मक्का सोडून मदिनेला जावं लागलं होतं. मक्केतील कालखंडातील कुराणात 'जिहाद' चा जो अर्थ आहे, तो स्वत:शीच केलेला संघर्ष, असा आहे. उलट मदिनेतील कालखंडातील आयतीत 'जिहाद'चा अर्थ हा लढाई वा संघर्ष असाच आहे. आज 'जिहादी दहशतवादी' जो अर्थ सांगत आहे, त्यावर बोट ठेवलं की, कुराण कोठं 'जिहाद'चा असा अर्थ सांगतं, असा प्रश्न विचारला जातो. पण दहशतवादी तर कुराणच उद्धृत करीत असतात. मात्र दहशतवादी जे सांगत आहे, तो कुराणातील 'जिहा'चा अर्थ आजच्या काळात गैरलागू आहे, त्याचा त्या काळातील संदर्भ वेगळा होता, हे स्पष्ट केलं जायला हवं. विशेष म्हणजे काळाच्या संदर्भात कुराणाचा अर्थ लावायला हवा, असं प्रेषिताचाही म्हणणं होतं. म्हणूनच त्यानं 'इज्तिहाद'ची संकल्पना मांडली.
या संकल्पनेची पार्श्वभूमीही आज लक्षात ठेवली जाणं गरजेचं आहे.
पैगंबरांनी येमेन या प्रांताचा सुभेदार म्हणून मुआद याची नेमणूक केली. त्यावेळी कारभार करताना न्यायदानाची तुझी पध्दत कशी असेल, असा प्रश्न पैगंबरांनी त्याला विचारला. कुराणातील तत्त्वांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं उत्तर मुआदनं दिलं. त्यावर 'कुराणात प्रत्येक परिस्थितीत न्याय देण्याच्या दृष्टीनं तत्त्व न मिळाल्यास काय करशील?' असा दुसरा प्रश्न प्रेषितांनी मुआदला विचारला. तेव्हा पैगंबरांच्या आदर्श जीवनातील घटनांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं मुआदचं उत्तर होतं. त्यानंही पैगंबराचं समाधान झालं नाही. माझ्या जीवनातील घटनांमुळंही न्यायदान करणं जर अशक्य झालं, तर काय करशील, असा प्रतिप्रश्न त्यांनी मुआदला केला. तेव्हा समाजातील विचारवंतांची मदत मी घेईन, असा जबाब मुआदनं दिला. विचारवंत काही सर्वज्ञानी नसतात, त्यांनाही काही गोष्टी कळत नसतात, मग काय करशील, असा सवाल प्रेषितांनी केला. शेवटी मुआद म्हणाला की, मी माझी सद्सदविवेक बुध्दी वापरीन आणि न्याय करीन.
हे उत्तर प्रेषितांनी मान्य केलं.
मुआदचं हे चौथे उत्तर म्हणजेच इज्तिहाद.
ही संकल्पनाच आपली सदसदविवेकबुध्दी वापरण्याचा हक्क प्रत्येक श्रध्दावानाला देते..
त्याचबरोबर 'पापी व जुलमी राज्यकर्त्यांचे आदेश धुडकावण्यास हरकत नाही, अन्यायी सुलतानाच्या समोर निर्भयपणं सत्य जाहीर करणं, यासारखं उत्कट धर्मयुध्द नाही, असं पैगंबरांनी म्हणून ठेवलं आहे. सुलतानाची कृती योग्य वा अयोग्य हे ठरवण्याचा प्रत्येक श्रध्दवानाला हक्क आहे, असाच पैगंबरांच्या या म्हणण्याचा अर्थ आहे. पण मुसलमानांच्या हिताच्या दृष्टीनं सुलतान समर्थ असायला हवा, असंही पैगंबरांनी म्हटलेलं आहे. या दोन्हीतील कोणतं मतप्रदर्शन कधी ग्राहय धरायचं, हे ठरवण्याचा अधिकार उलेमांनी स्वत:कडे घेतला आणि राज्यकर्त्यांच्या बाजूनं राहून त्यांना फायद्याचे ठरणारे निर्णय दिले. या संदर्भात औरंजेबाच्या काळातील उदाहरण बघता येईल. औरंजेबानं आपल्या तिन्ही भावांना ठार मारलं. पण तसं करताना इतर दोघांच्या नंतर दारा शिकोहला मृत्यूदंड देताना त्यानं स्वत: निर्णय घेतला नाही. त्यानं दारा शिकोहचं काय करायचं, याचा निर्णय उलमांवर सोपवला. दारा शिकोहची लोकप्रियता लक्षात घेता, त्याला मृत्यूदंड देण्याच्या कृतीला धर्मशास्त्राचं पाठबळ आहे, हे दर्शवणं औरंजेबालाही आवश्यक वाटत होतं. अर्थात उलेमा दाराला पाखंडी ठरवतील आणि मग या गुन्हयाबद्दल शासन काय करायचं, याचा निर्णय 'मृत्यूदंड' असाच देतील, याची औरंजेबाला खात्री होतीच.
इस्लामच्या सुरूवातीच्या वाटचालीत जी प्रगती झाली, तिला पुढं 13 व्या शतकांनर खीळ बसली, ती कुराणातील विविध वचनांचा काळानुसार योग्य अर्थ लावण्याकडं उलेमांनी पाठ फिरवल्यानं आणि राज्यकर्त्यांना हवं तसं व हवं तेव्हा कुराणातील विशिष्ट वचनांचा अर्थ लावण्यास त्यांनी सुरूवात केल्यामुळं.
एवढंच कशाला, जेथे मुस्लिम बहुसंख्य नाहीत, तेथे इतर धर्मियांच्या राज्यात कसं राहायचं, कसं वागायचं, आपलं धर्माचरण कसं करायचं, हा इस्लामधर्मीयांच्या दृष्टीनं कळीचा प्रश्न असतो. पण या संदर्भात पैगंबरांनीच आपल्या कृतीनं काही दाखले देऊन ठेवले आहेत. मदिनेत असताना तेथील बहुधर्मीय समाजात वेळ पडल्यास इतर धर्मीयांशी सहकार्य करण्यास हरकत नाही, असा दाखला पैगंबरांनी आपल्या कृतीनं घालून दिला आहे. पैगंबरांच्या याच दाखल्याचा वापर मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांनी कसं सहभागी होणं आवश्यक आहे, हे पटवण्यासाठी केला होता.
अरबस्तानातील सतत संघर्ष करणाऱ्या युध्दखोर टोळयांना एकत्र आणून त्यांना एका समान शध्देच्या धाग्यानं बांधून ठेवण्यासाठी 'ईश्वराचे आपण लाडके आहोत, पूर्वीच्या सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टी इस्लाममध्ये समावलेल्या आहेत, तोच एकमेव धर्म उरला पाहिजे व त्याच्या प्रचाराची जबाबदारी आपल्यावर ईश्वरानंच टाकली आहे, अशी शिकवण पैगंबरांनी दिली. सहाव्या शतकातील अरबस्तानात एक नवा समाज निर्माण करण्यासाठी हे सांगणं पैगंबरांनी आवश्यक होतं. त्यांना विविध स्थानिक पंथ व ख्रिश्चन व ज्यूंच्या प्रभावाला तोंड देत आपला धर्म प्रस्थापित करायचा होता. आज शेकडो वर्षांनतंर तोच दृष्टिकोन बाळगला जाणं हे कालबाहयतेचं लक्षण आहे.
कुराणाच्या मर्यादा स्वत पैगंबरांनीच जाणल्या होत्या. म्हणूनच 'मी मनावापेक्षा अधिक कोणी नाही, जेव्हा मी धर्माबद्दल आज्ञा देतो, तेव्हा तिचा स्वीकार करा, पण ज्यावेळी मी ऐहिक गोष्टीबाबत आज्ञा देतो, तेव्हा मी मानवापेक्षा जरादेखील वेगळा नसतो', असं पैगंबरांनीच म्हणून ठेवलं आहे.
म्हणूनच 'धर्म' कोंठं संपतो आणि 'ऐहिका'ला कोठं सुरूवात होते, याचा निर्णय घेऊन हे दोन धागे वेगवेगळे करून त्याची निरगाठ सोडवणं, हाच मुस्लिम समाजापुढील आजचा खरा पेच आहे.
इस्लामाची तत्त्वं पाळल्यामुळं निर्माळा झालेली आपली ओळख गमावली, तर दोन तीन पिढयांतच आपलं अस्तित्व संपून जाईल, अशी भीती बहुसंख्य मुसलमानांना वााते. काण धार्मिकदृष्टया मुसलमानांना आपली 'मुस्लिम' म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याची गरज्च नाही. धर्म व संस्कृती या दोन वेगळया गोष्टी आहेत. इस्लाम जगात जेथे जेथे पसरला, त्यापैकी अनेक ठिकाणी तो स्थानिक संस्कृतीत रूजला.
ही घडी पुन्हा बसवण्यासाठी मुस्लिमांना अंतर्मुख होण्याची नितांत आवयकता आहे. भारतीय वातावरणाशी मिळतेजुळते घेणारा आणि तसं करण्यास पाठबळ देणारा 'सुधारणावादी इस्लाम'चा विचार होणं गरजेचं आहे. पैगंबरानीच म्हणून ठेवलं आहे की, एकवेळ अशी येईल की, इस्वामच्या स्वरूपात बदल होऊ शकेल. आणि असं करण्यासाठी जी यंत्रणा लागेल ती 'इज्मा (विचारवंताशी सल्लामसलत), इज्तिहाद ( काळानुसार कुराणाचा अर्थ लावण्याची मुभा) आणि कयास (सदसदविवेक बुध्दीनं शध्दवानांनी कुराणाच्या आज्ञाचा लावलेला अर्थ) पुरवेल. इतर किताबी धर्मांच्या अनुयायांनी या अशा समस्येला योग्य प्रकारे तोंड दिलं. ख्रिस्ती धर्माला अवघड सुधारणावादी चळवळीच्या पवांतून जावं लागलं. त्यानतंर ख्रिस्ती लोक सामाजिक प्रगतीत आघाडीवर राहिले. ज्यू धर्माही व्यवहारवादी ठरला. भारतात शीख, बौध्द, जैन यांनीही आपली 'व्यक्तित्व' व ' ओळख' राखून भारतीय प्रवाहात सामील होण्यात यश मिळवलं.
ही चाकोरी मुसलमान समाजालाही चालावी लागणार आहे.
त्यासाठी बहुसंख्याक समाजाची त्यांना साथ मिळायला हवी. बहुसंख्याक समाजातील सर्वसमान्य मुसलमानांच्या समस्यांबद्दल अज्ञानी असतात. बहुसंख्याक समाजानं आपला नकारात्मक जातीयवाद हा कार्यक्षम विधायक मानवतावादात रूपांतरित केला पाहिजे. सध्या मुसलमानांकडे हिंदूंचे लक्ष्य जाते, ते त्यांच्यावर टीका करण्याच्या निमित्तानंच. आपण येथे स्वीकारले जात आहोत, ही भावना मुस्लिम समाजात निर्माण होणयासाठी बहुसंख्याकांचा मदतीचा हातच पुढं आला पाहिजे. तशीच बहुसंख्याकांनी मुस्लिमांप्रती सहअनुभूतचा-- सहानुभूतीचा नव्हे--उदार विधायक दृष्टिकोन स्वीकारायला हवा. हिंदूधर्म आणि हिंदुत्व एक नाहीत. ज्याना हिंदुत्व हवं आहे, त्यांना हिंदू धर्म हा एकसाची सांस्कृतिकतेत बंदितस्त करायचा आहे. त्यांना 'हिंदूंचा पाकिस्तान' हवा आहे. असं करू पाहणारे हे बहुसंख्याक समाजातही अल्पमतातच आहेत, हे मुस्लिमांनीही लक्षात घेण्याची गरज आहे.
अशा मूलभूत विचाराला जेव्हा मुस्लिम समाजात सुरूवात होईल, तेव्हाच मालेगावसारख्या घटना कालबाहय होत जातील.

2 comments:

  1. Read a fantastic book recently by Fakruddin Bennur titled ' Adhunik Bharatatil Muslim vicharvant'. Many of the scholars he wrote about indeed engaged the ijma and ijtehaad in oder to take their interpretations of Islam further. I think the secular and non-religious thinkers should come to terms with majority that is religious and culturally secular/tolerant. That way the secularist will be able to understand and share without being charitable or condescending towards religious communities. I guess that way some space to negotiate the differences between different religious communities will grow. The secularist vocabulary needs to be enhanced though. The protestant secularism might not work the way it has worked in the West! (imho)- Dnyanada

    ReplyDelete
  2. This is a very enlightening post.

    ReplyDelete