SÛleÛjpÙele

Tuesday, June 8, 2010

पवारांचा गेम

आयपीएलच्या पुणे संघाच्या लिलावात शरद वापर व त्यांच्या कुटुंबियाचे शेअर्स असलेल्या 'सिटी कॉर्प' या कंपनीनं बोली केली होती, हा तपशील उघड झाल्यावर पुन्हा एकदा वादाचं वादळ उठलं आहे.
...आणि पवार हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत.
मी व माझ्या कुटुंबियांपैकी कोणाचीही आयपीएलच्या कोणत्याही संघात भागिदारी नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली होती. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही हेच वारंवार सांगितलं होतं. मात्र आता नवा तपशील उघड झाल्यावर पवार व सुप्रिया हे दोघंही जे खुलासे करीत आहेत, ते कोणालाही पटणारे नाहीत. आता तर बंगलोरच्या संघातही पवार यांर्चीं 15 टक्कश् भागिदारी आहे, हे उघड झाले आहे.
मग शशी थरूर यांना जो न्याय लावला, तोच पवार यांना लावला जायला नको काय? पण तसं होणार नाही; कारण आघाडीच्या राजकारणाच्या मर्यादा. ज्या न्यायानं हजारो कोटींचा घोटाळा करून द्रमुकच्या डी. राजा यांना मंत्रिंमडळातून काढणं पंतप्रधानांना अशक्य झालं आहे, त्याच न्यायानं पवार यांनाही राजीनामा देण्यास सांगणं डॉ. मनमोहन सिंह यांना शक्य नाही. थङर हे काँग्रेस पक्षाचे मंत्री होते, म्हणून त्यांना दरवाजा दाखवला गेला.
अर्थात पवार मंत्रीपद टिकवतील. पुढच्या निवडणुकीत पुन्हा लोकसभेत आठ दहा खासदार व महाराष्ट्रता 60 ते 70 आमदार निवडून आणतील. मात्र पवार यांची विश्वासार्हता लायला जात आहे, हेही तेवढंच खरं. आतापर्यंत पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेचाच प्रश्न होता. आता त्यांच्या व्यक्तिगत विश्वासार्हतेवरही सावट आलं आहे.
साहजिकच आज राजकारणात एका उंचीवर पोचलेला हा नेता असं का वागतो, असा प्रश्न पडल्याविना राहत नाही.
राज्याची, देशाची, जगची इतकी चांगली जाण असलेल्या; सक्षम नेतृत्वगुण असलेल्या, अफाट काम करण्याची क्षमता बाळगणाऱ्या अशा या नेत्याच्या कामाचं चीज काँग्रेसमध्ये झालं नाही, हे खरंच. त्यापायीच सोनिया गांधी यांच्या परदेशीपणाचा----पवार यांच्या तोपर्यंतच्या राजकारणाला न मानवणारा---मुद्दा उठवुन त्यांनी स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थान केला. पण काँग्रेसनं केलेल्या या 'अन्याय'च्या विरोधता लढताना पवार हळुहळू आपलं राजकीय भान गमावून तर बसलेले नाहीत ना, असं वाटण्याजोगी त्यांची पावलं पडत गेली आहेत.
आपल्याच सरकारची, आपल्याच पक्षाची कणी कापायची, हे पवारांचे डावपेच काही नवे नाहीत. यापूर्वी अनेकदा ते असे डावपेच खेळले आहेत. किबहुना मित्र व शत्रू या दोघांनाही सतत कात्रजचा घाट दाखवण्याच्या चलाख राजकीय रणनीतीमुळं पवारांची विश्वासार्हता कायम घटत गेली आहे. सुरूवातीच्या काळत पवारांच्या या चलखीच्या राजकारणाची वाहवा होत गेली. काय हा नेता आहे, कसा हा सगळयांना गुंडाळून ठेवता, असं कौतुकानं म्हटलं जायचं. पण असं म्हणणाऱ्यांनाच पुढं पुढं पवारांच्या चलाखीचा फटका बसत गेला. या चलाखीच्या राजकारणातील डावपेचांत पवार 'आपला व बाहेर'चा असा फरक करीत नाहीत, स्वत:पलीकडं त्यांना काही दिसत नाही, हे त्याच्या समर्थकांच्याही लक्षात येऊ लागलं.
पक्षाच्या विरोधकांना आपल्या तैनाती फौजेप्रमाणं वापरणं, हा डाव काँग्रेसमध्ये असताना पवार खेळत असत. त्यासाठी जनता दल व तिसऱ्या आघाडीवाल्ऱ्या इतर पक्षाचा ते वापर करीत असत. आता काँग्र्रेस सोडून स्वत:चा पक्ष काढल्यावर ते सेनेला वापरून घेत आले आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या युतीचा धुरळा स्वत: नामानिराळं राहून पवार यांनीच हेतूत: उठवला होता. काँग्रसवर दबाव आणायचा, जास्त जाग पदारात पाडून घ्यायच्या, हा उद्द्ेश त्यामागं होता. या डावपेचांत सेना तर फसलीच, पण काँग्रेसला 'कात्रजचा घाट' दाखवण्याच्या या डावपेचांची झळ पवार यांनाही निवडणूक निकालात बसलीच. विधानसभा निवडणुकीतही काहीसा असाच प्रकार झाला.
हे चलाखीचं राजकारण आता फायद्याचं ठरत नाही, याची प्रचीती पवार यांना अलीकडच्या काळात वारंवार आली आहे. तरीही पवार काही धडा घ्यायला तयार नाहीत. त्याचबरोबर पवार यांचे राजकीय आडाखेही चुकत गेल आहेत. त्या प्रमाणात त्याचं वागणंही अधिकाधिक त्रासलेपणाचं बनत गेल्याचं आढळून येत आहे. महारागाईच्या प्रश्नावर 'मी ज्योतिषी नाही' हे त्यांचें वक्तव्यं आणि लगेरच ' आठवडाभरात भाव खाली येतील', ही त्यांची ग्वाही या गोष्टी पवारांचा 'शुअर टच' जात असल्यचं लक्षण आहे.
ंखरं तर पवार यांना स्वत:चं वेगळं राजकीय बळ एका मयादेपलीकडं वाढवता आलेलं नाही. अगदी पुलोदच्या काळापासून त्यांचं राजकीय बळ सर्वसाधारणत: आहे तेथेच राहिलं आहे. काँग्रेसच्या बाहेर जाऊन आपल्याला स्वबळावर सत्ता मिळत नाही, हे 1985 साली पवारांना दिसून आलं होतं. तरीही 1999 साली त्यांनी स्वत:चा पक्ष काढण्याचं पाऊल उचललं आणि ते फसल्याचं त्यांना काँग्रेसशीच आघाडी करणं भाग पडलं. काँग्रेसला पवारांविना पर्याय नाही आणि पवारांना काँग्रंसशी जुळवून घेण्याविना गत्यंतर नाह, हे त्या नंतरच्या ग्रामपंचायती ते लोकसभा अशा सर्व निवडणुकांत सिध्द झालं आहे. काँग्रेस व पवार हे एकमेकांना पूरक आहेत, पण ते वेगळे झाले, तर एकमेकांना पाडू शकतात.
....कारण काँग्रेस व पवार यांच्या पक्षात काही फरक नाही. ते खरे एकच पक्ष आहेत. फक्त पवार यांची महत्वाकांक्षा पुरी झाली नाही, म्हणून त्यांनी आपला वेगळा पक्ष काढला एवढंच. पवारानंतर या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकणं अशक्य आहे. त्यातील मोठा भाग काँग्रेसमध्येच जाणार आहे. पंतप्रधान बनण्याची आपली महत्वाकांक्षा कधीच पुरी होणार नाही, राज्यातील आपलं बस्तान टिकवायचं असल्यास काँग्रेसशी जुळवून घ्यायला हवं, हे 2004 सालातील निवडणुकानंतर पवार यांना कळून चुकलं आहे. म्हणूनच सोनिया यांच्या परदेशीपणाचा मुद्दा आता कालबाहय झाला असल्याची कबुली त्यांना देणं भाग पडलं. तरीही पक्ष वेगळा ठेवण्याचं कारण काय? तर राज्यातील आपल्या राजकीय बळाच्या आधारे केंद्रातील सत्तेत वाटा मिळत राहावा, एवढाच पवार यांचा आता मर्यादित उद्द्ेश आहे. राज्यातील हे राजकीय बळ वाढवत नेऊन राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रबळ प्रादेशिक पक्ष त्यांना बनवायचा आहे. इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांचं 'मॉडेल' त्यांच्यापुढं आहे. येती काही वर्षे केंद्रात आघाडीचं राजकारणच राहणार, तेव्हा प्रादेशिक पक्षांना महत्व आहे, हे पवार जाणून आहेत. म्हणूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रबळ प्रादेशिक पक्ष बनवायचा आहे. त्यासाठी काँग्रेसचं खच्चीकरण होणं आवश्यक आहे. म्हणूनच काँग्रेसशी आघाडी करतानाच त्या पक्षाला सतत आडवं जाण्याची रणनीती पवार अवलंबत आहेत.
त्यासाठी ते शिवसेनेला वापरून घेत आहेत. राहूल मुंबईत येऊन गेल्यावर त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. त्यातच महागाईच्या प्रश्नावरून काँग्रेस पवारांना प्रत्यक्ष--अप्रत्यक्ष लक्ष्य करीत आहे. तेव्हा काँग्रेसला उत्तर देण्यासाठी पवार सेनाप्रमुखांना भेटले आणि ी त्यांनी सेनेला उभारी दिली.
मात्र पवार सेनेशी कधीच उघड युती करणार नाहीत. असं केल्यास आपल्या आतापर्यंतच्या 'पुरोगामी' प्रतिमेला तडा जाईल, हे ते जाणून आहेत.. त्याचबरोबर सेना राजकीयदृष्टया निष्प्रभ होणं, हे पवार यांना आपल्या गैरसोईचं वाटत आहे. सेना एका मर्यादेबाहेर वाढू नये, पण ती पूर्ण संपूही नये, अशा बेतानं पवार आपला 'गेम' खेळत आहेत.
या डावपेचांना उत्तर म्हणून पवार यांच्या राजकारणाबाहेरच्या 'डील्स' प्रसार माध्यमांपर्यंत पोचवण्याचा प्रतिडाव काँग्रेस खेळत आहे. त्याचीच परिणती आयपीएलच्या वादात पवार ओढले जाण्यात झाली आहे. प्रत्येकाला कात्रजचा घाट दाखवण्याच्या पवार यांच्या रणनीतीचाच यासाठी काँग्रेसला उपयोग होत आहे. पवार जो गेम खेळतात, तसाच तो खेळून त्यांना अडचणीत आणण्याचा हा काँग्रेसचा बेत आहे.
...आणि या प्रकरात पवार यांच्या व्यक्तिगत विश्वासार्हतेची विकेट पडण्याची शक्यता आहे.खरं तर पवार यांच्यासारख्या नेत्यांनं आपल्या राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावर थोडा वेगळा विचार करायला हवा होता. सक्रीय राजकारणाबाहेर जे देशाचे व राज्यााचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना हात घालणं, पवार यांच्यासारख्यांना शक्य आहे. या प्रश्नावर जनजागृती करणं, ते धसास लावण, असं काही पवार करू शकतात. असं केल्यानं त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार आहे. पण पैसा आणि सत्ता या चक्रव्यूहाबाहेर पडण्याची पवार यांची तयारी दिसत नाही. आपली सारी प्रगल्भता ते या चक्रयूहात जास्तीत जास्त कसं यशस्वी होता येईल, याचसाठी वापरताना दिसत आहेत.
परिणामी आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत पवारांनी जे काही मिळवलं आहे, ते त्यांच्या या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात ते गमावून बसण्याचा धोका आहे.
असं झालं, तर ती पवार यांची व्यक्तिगत शोकांतिका तर ठरेलच, पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातीलही तो एक दुर्दैवी टप्पा ठरेल.

1 comment:

  1. Overambition was his undoing: as Shekhar Gupta said sometime back.

    ReplyDelete